अहमदाबाद : वृत्तसंस्था – ठाकोर समाजाच्या जात पंचायतीने मनमानी करत एक नवीनच फतवा काढला आहे. ठाकोर समाजातील अविवाहित मुलींनी मोबाईल वापरायचा नाही. असे अजब फर्मान पंचायतीने काढले आहे. जर मोबाईल वापरताना मुलगी आढळली तर तिच्या वडिलांनी १.५ लाखांचा दंड पंचायतीकडे जमा करावा. निर्णय पंचायतीने घेतला आहे.
ठाकोर समाजातील लोकांची रविवारी पंचायत झाली. जालोल गावात ही पंचायत झाली. तसेच गावातील लोक पंचायतीच्या नियमांनाच संविधान मानतात. त्यामुळे या पंचायतीचे लोक नियम तयार करतात. पंचायतीने अविवाहित मुलींनी मोबाईल वापरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. या नव्या नियमानुसार पंचायतीने मुलींनी मोबाईल वापरणे हा गुन्हा ठरविला आहे.
असा आहे फतवा
ठाकोर समाजातील अविवाहित मुलगी मोबाईल वापरताना आढळली तर तो गुन्हा आहे. तिच्या वडिलांनी पंचायतीकडे १.५ लाख रुपयांचा दंड भरावा असा फतवा काढण्यात आला आहे. तसेच जर एखादी मुलगी कुटुंबियांच्या परवागनगीविना लग्न करत असेल तर तोही गुन्हा ठरविण्यात आला आहे.
जिल्हा पंचायत सदस्य यावर म्हणाला की, पंचायतीने समाजहिताचे काही निर्णय घेतले आहेत. विवाहवेळचा अवास्तव खर्च रोखण्यासाठी डिजे, फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच मोबाईल बाळगणे आणि त्यावर दंड आकारण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असून तो निर्णय अजून लागू झालेला नाही.