मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Thackeray Government | कोरोना संकटादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोक कलावंतांसाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. ठाकरे सरकार (Thackeray Government) लोक कलावंतांना 5 हजार रुपयांची मदत करणार आहे. या निर्णयाने राज्यातील किमान 56 हजार कलावंतांना आर्थिक मदत मिळेल.
राज्य सरकारकडून हे एकरकमी अनुदान दिले जात आहे जेणेकरून कलावंत महामारीच्या आर्थिक संकटातून सावरू शकतील.
राज्य सरकारने आपल्या एका वक्तव्यात म्हटले की, राज्यात लोककला मंडळाच्या शेकडो कलाकार, संचालक, मालक आणि निर्माता कोरोना काळात भयंकर आर्थिक संकटाचा सामना करत होते. हे पाहता कलाकारांना एकरकमी कोविड अनुदान देण्यास मंजूरी दिली आहे.
State Government ने म्हटले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळात याबाबत एक सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र मागील दिड वर्षापासून कोविड-19 महामारीला तोंड देत आहे.
कोविड-19 महामारीमुळे राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर प्रतिबंध असल्याने कलाकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 56,000 कलाकारांना पाच-पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
28 कोटी रुपये होतील खर्च
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुण्यात सुमारे 8 हजार कलाकार
आहेत आणि राज्याच्या उर्वरित भागात सुमारे 48 हजार कलाकार रहात आहेत.
या सर्व कलाकारांना आर्थिक मदत दिली जाईल.
प्रत्येक कलाकाराला 5,000 रुपये प्रदान केले जातील.
सरकारच्या या निर्णयानंतर 28 कोटी रुपये खर्च केले जातील.
राज्यात प्रायोगिक कलाक्षेत्रात विविध कला मंडळ कार्य करत आहेत.
कोविड -19 महामारीमुळे दिडवर्षापासून कोणतेही काम नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
कोविड अनुदानांतर्गत शाहीर, एकपात्री प्रयोग, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- सीजनल, दशावतार, नाटक, विधिनाट्य, सर्कस आणि टूरिंग टॉकीज सारख्या जवळपास 847 संघटनांच्या कलाकारांना मदत केली जाईल.
राज्यात कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकारांची निवड आणि इतर आकस्मिक खर्चावर एक कोटी रुपये खर्च केले जातील.
Web Title :- Thackeray Government | corona pandemic folk artists in maharashtra to get financial assistance from uddhav thackeray government covid relief grant
Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय, रिटर्न न भरणारे 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत हे काम
SBI |SBI ग्राहकांचा प्रश्न – खात्यात किती रुपये ठेवण्याची आवश्यकता? जाणून घ्या याचे योग्य उत्तर