बहुजननामा ऑनलाइन टीम – वडाळ्याजवळ तांत्रिक(Technical) बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली होती.सकाळीच ही घटना घडल्याने ज्या प्रवाशाना लोकलची मुभा आहे त्यांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला. त्यानंतर हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा पूर्ववत झाली.
हार्बर मार्गावरील वडाळ्याजवळ असलेल्या रेल्वे प्रकल्पात तांत्रिक(Technical) बिघाड झाल्यामुळे वडाळा ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसटी या सर्व लोकल गाड्या ठेवण्यात आल्या बंद होत्या असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. मात्र, राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सर्व महिलांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी दिली.
शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांना पत्र पत्र लिहून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रवासाची गैरसाय हाेऊ नये म्हणून त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली आहे.त्यामुळे त्यांनाही आता लोकल प्रवासाची आहे. याशिवाय, दिवाळीनंतर सर्वसामान्यांसाठी सुद्धा लोकल सेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.