बहुजननामा ऑनलाइन टीम – साधी राहणी आणि उच्च विचार या महात्मा गांधींच्या(Taking Gandhiji) विचाराला आणि साधेपणाला देशानं गौरवलं. आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो सामान्य माणूस त्यांच्या जवळ सहजपणे जाऊ शकत होता. एक धोती(Taking Gandhiji) आणि पंचा घालून फिरणाऱ्या या साध्या माणसानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 लाखांचा सूट घालून फिरतात. ही देशाला शोभा देणारी गोष्ट नाही असा थेट हल्ला काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच के पाटील यांनी केला आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पाटील म्हणाले, “महात्मा गांधींच्या आयुष्याशी तुलना करताना जाणवणारा हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियानात गांधीजींचा चष्मा वापरतो. त्यांच्या काठीचाही वापर प्रतिकात्मकरित्या करतो. कृती मात्र भलतीच करतो. हा मोठा विरोधाभास आहे.
स्वच्छ भारत अभियान हा काही नवीन कार्यक्रम नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निर्मल भारत ची कल्पना मांडली. त्यात मोठं काम केलं. परंतु मोदी सरकारनं पुढे त्याचे नाव बदलून स्वच्छ भारत अभियान केलं. नावं बदलली तरी चालेल परंतु देशात त्यासाठी काम झालं पाहिजे. कर्नाटकात ग्रामविकास आणि पंचायत राज या विभागाचे मंत्री असताना आपल्याला सलग 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असंही त्यांनी सांगितलं.
पीएम मोदी यांच्या ग्रामीण विकासाला आपण पुरस्काराच्या कोणत्या टप्प्यावर बघता ? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, “ग्रामीण विकासासाठी सुरुवातीला जी कामं झाली ती योग्य होती. मात्र पुढं ग्रामीण विकासाचा संपूर्ण फोकस बदलला. ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांना केंद्रानं जो निधी द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. अनेक योजनांना मंजुरी मिळाली नाही. त्यामुळं जे काम व्हायला हवं होतं तेही झालं नाही” असंही ते म्हणाले.