औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा सातारा पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील नाभिक समाजातील इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भाग्यश्री संतोष माने हिचा २३ जानेवारी रोजी कुणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. मात्र या घटनेतील मारेकरी अद्यापही फरार असून त्यांना तात्काळ जेरबंद करून आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन नाभिक सेना संघातर्फे स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलिसांना देण्यात आले.
करपेवाडी येथील १२ वी वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भाग्यश्री संतोष माने हिची २३ जानेवारी २०१९ रोजी कुणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने हत्या केली. मात्र या घटनेला आठवडा उलटूनही हल्लेखोर मारेकरी अद्यापही जेरबंद करण्यात आले नाहीत. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी. तसेच या खुनातील आरोपींना अटक होईपर्यंत माने कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, हलाखीच्या परिस्थितीमुळे न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, माने कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी आदी मागण्यांसह या खुनातील मारेकऱ्यांना अटक न झाल्यास नाभिक सेवा संघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.
हे निवेदन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख फौजदार राहुल रोडे यांना देण्यात आले. यावेळी सहायक फौजदार राजेश वाघ, नाना पटारे यांच्यासह नाभिक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष माधव भाले, जिल्हाध्यक्ष योगेश खटले, आबासाहेब बोरुडे, अक्षय सोनटक्के, विष्णू मोरे, माणिक सोनटक्के, बाळकृष्ण वाघ, रघुनाथ बर्वे, बळीराम भाले, भारत खटले, कैलास जाधव, विष्णू क्षीरसागर, देविदास तोडकर, गणेश राऊत, राम खटले, विजय जगधने आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा सातारा पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील नाभिक समाजातील इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भाग्यश्री संतोष माने हिचा २३ जानेवारी रोजी कुणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. मात्र या घटनेतील मारेकरी अद्यापही फरार असून त्यांना तात्काळ जेरबंद करून आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन नाभिक सेना संघातर्फे स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलिसांना देण्यात आले.
करपेवाडी येथील १२ वी वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भाग्यश्री संतोष माने हिची २३ जानेवारी २०१९ रोजी कुणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने हत्या केली. मात्र या घटनेला आठवडा उलटूनही हल्लेखोर मारेकरी अद्यापही जेरबंद करण्यात आले नाहीत. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी. तसेच या खुनातील आरोपींना अटक होईपर्यंत माने कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, हलाखीच्या परिस्थितीमुळे न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, माने कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी आदी मागण्यांसह या खुनातील मारेकऱ्यांना अटक न झाल्यास नाभिक सेवा संघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.
हे निवेदन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख फौजदार राहुल रोडे यांना देण्यात आले. यावेळी सहायक फौजदार राजेश वाघ, नाना पटारे यांच्यासह नाभिक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष माधव भाले, जिल्हाध्यक्ष योगेश खटले, आबासाहेब बोरुडे, अक्षय सोनटक्के, विष्णू मोरे, माणिक सोनटक्के, बाळकृष्ण वाघ, रघुनाथ बर्वे, बळीराम भाले, भारत खटले, कैलास जाधव, विष्णू क्षीरसागर, देविदास तोडकर, गणेश राऊत, राम खटले, विजय जगधने आदींची उपस्थिती होती.