पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत, १३ टक्के शिक्षणात आरक्षणाचा निकाल दिला. न्यायालयाने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य करुन मराठा समाजाला न्याय दिला. परंतु आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनात आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयानेही मराठा समाजाच्या मागणीवर शिक्कामोर्तब केले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे शिवशाही व्यापारी संघाचे व लहुजी शक्तीसेना पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी मनापासून स्वागत करत आहेत. परंतु आरक्षण मिळवण्याच्या या लढाईत मराठा बांधवाबरोबरच अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांनी तसेच बहुजन समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे शासनाने तातडीने मागे घ्यावेत, तरच आरक्षणाचा फायदा समाजातील युवकांना नोकरी व शिक्षणासाठी होईल.अशी मागणी या निवदेनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांची स्वाक्षरी आहे.