बहुजननामा ऑनलाइन टीम – भारत -पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारा टी- 55 जातीचा रणगाडा अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर(indo-pak-war-on-the-shores-
रायगडचे माजी जिल्हाधिकरी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रायगडच्या पर्यटनला चालना देण्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे ब्ल्यू फ्लॅग करण्याचा त्यांचा मानस होता. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर रणगाडा बसविण्याची योजनाही त्यांनीच आखली होती. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. डॉ. सूर्यवंशी यांची बदली झाली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांच्या प्रयत्नांतून रणगाडा उपलब्ध झाला आहे. शुक्रवारी हा रणगाडा अलिबागमध्ये दाखल झाला आहे. टी – 55 टॅक हा रणगाडा 1971 च्या भारत-पाक युद्धात वापरला होता. प्रदीर्घ देशसेवेतून निवृत्त झालेला हा रणगाडा आता अलिबाग समुद्र किनाऱ्याची शोभा वाढविणार आहे.