बहुजननामा ऑनलाईन टीम – टी- 20 विश्वचषक स्पर्धेत (T-20 World Cup) भारताचा इंग्लंडकडून (England) मानहानीकारक पराभव झाल्याने टीम इंडियाचे वर्ल्डकप (T-20 World Cup) जिंकण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. टीम इंडियाचा हा पराभव बीसीसीआयच्या (BCCI) चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर बीसीआयने मोठा निर्णय घेत चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या स्पर्धेत (T-20 World Cup) इंग्लंडने भारताचा 10 गडी आणि 4 षटके राखून दारुण पराभव केला. यानंतर बीसीसीआय कर्णधार अथवा प्रशिक्षक यांच्याबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता होती मात्र आता बीसीसीआयने पूर्ण निवड समितीच बरखास्त केली आहे. तसेच निवड समितीसाठी नवीन जाहिरात देण्यात आली आहे. बरखास्त करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये चेतन शर्मा (Chetan Sharma), हरविंदर सिंग (Harvinder Singh), सुनील जोशी (Sunil Joshi), आणि देबाशिष मोहंती (Debashish Mohanty) यांचा समावेश होता.
https://twitter.com/BCCI/status/1593628505589264384
टी-20 विश्वचषकात स्पर्धेत चेनत शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघाची निवड केली होती.
ती निवड समितीच बीसीसीआयकडून आता बरखास्त करण्यात आली आहे.
त्यामुळे आता बीसीआयकडून नवीन निवड समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
यासाठी बीसीआयकडून जाहिरात देण्यात आली आहे यामध्ये निवड समितीसाठी कोण पात्र ठरू शकतात,
याची माहिती देण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- T-20 World Cup | bcci dismised selection committee led by chetan sharma invites new applications
हे देखील वाचा :