बहुजननामा ऑनलाईन – अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. सावरकर, जेएनयू, राहुल गांधी यांच्यावर अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. चीननंतर आता भारतात कोरोना व्हायरसची भीती वाढली असून दिल्लीतही याची भीती निर्माण झाली आहे. अशात स्वामी चक्रपाणी यांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी शनिवारी दिल्लीत एक गोमूत्र पार्टीचे आयोजन केले आहे.
गोमूत्र पार्टीबद्दल स्वामी चक्रपाणी म्हणाले की, ‘देशात कोरोना व्हायरची भीती वाढत असून आपल्या जीवन पद्धतीत त्यापासून बचावण्याचा उपाय आहे. कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी आम्ही दिल्लीत एक गोमूत्र पार्टीचे आयोजन करत आहोत. जिथे पहिले होम होईल. मग कुल्हडमध्ये गोमूत्र प्यायला दिले जाईल. त्यानंतर भजन होईल.’
जेव्हा स्वामी चक्रपाणी यांना विचारले गेले कि गोमूत्रमुळे कोरोना व्हायरस बरा होईल कि यापासून बचाव कसा होईल? तेव्हा त्यांनी म्हटले की, “गोमूत्रमध्ये ३२ प्रकारचे सत्व असतात जे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीला नीट ठेवतात. गोमूत्राचे सेवन केल्यानानतंत्र कोरोना होणारच नाही. जर कोणाला कोरोना झाला तर गोमूत्राचे सेवन केल्याने हळूहळू ठीक होईल.”
तसेच त्यांना आस्थेच्या आधारावर हे म्हणत आहात कि वैज्ञानिक परीक्षणाच्या आधारावर तेव्हा ते म्हणाले की, “ही आस्थेचीच गोष्ट आहे. गोमूत्र शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. हे शास्त्रातही लिहिले आहे. आमची अनेक देशात शाखा आहे. पूर्ण भारतात आम्ही या प्रकारची पार्टी करणार आहोत आणि कोरोनापासून बचावण्याची तयारी करणार आहोत.”
त्यांची शाखा चीनमध्येही आहे का, असेही त्यांना विचारण्यात आले. तिथे सर्वात जास्त मृत्यू कोरोनामुळे झाले असून यावर ते म्हणाले की, चीनमध्ये आमची कोणतीही शाखा नाही. वन्यजीवांना ठार मारल्यानंतर फक्त करुणाच नष्ट झाली. म्हणूनच करुणेतून चीनमधील कोरोनाचा जन्म झाला. भारतात अशी परिस्थिती होऊ नये. आम्ही प्राण्यांच्या कल्याणासाठी बोलत आहोत.”