पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ जगावर ठाम आहे. नुकत्याच झालेल्या शेतकरी संघटनेच्या बैठकीत असा ठराव पास करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाआघाडीने याबाबत ८ दिवसात आपला निर्णय कळवावा असा ठराव बैठकीत पास करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. त्यात बैठकीत ५ ठराव पास करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. दिडपट हमीभाव व कर्जमुक्ती या मुद्यांवर किमान समान कार्यक्रम आधारीत असला पाहिजे. याबाबतीत कुठलीही तडजोड करणार नसल्याचा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पास करण्यात आला.
या लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक नसलेल्या ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी दशरथ सावंत तर सदस्य म्हणून डॉ. प्रकाश पोपळे, सतिश काकडे, भगवान काटे, जयकुमार कोले यांचा समावेश आहे.