नवी दिल्ली (बहुजननामा ऑनलाइन) – माजी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. आपल्या कतृत्त्वाने सुषमा स्वराज यांनी राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ आपले अढळ स्थान निर्माण केले. राजकारणासोबत त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनात देखील अनेक धाडसी निर्णय घेतले. असाच त्यांचा एक धाडसी निर्णय म्हणजे आपल्या आई वडीलांचा विरोध असूनही स्वराज कौशल यांच्यासोबत केलेला प्रेमविवाह.
पंजाब विद्यापीठ चंदीगडच्या कायदा(लॉ) डिपार्टमेंटपासून सुषमा आणि स्वराज यांची प्रेम कहानी सुरू झाली होती. त्यावेळी ते दोघे पहिल्यांदा भेटले आणि बघताच ते प्रेमात पडले. दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्या काळी नवऱ्याचे तोंड देखील लग्न नंतरच मुली पाहत होत्या. त्या काळात सुषमा स्वराज यांनी आपल्या आई वडीलांना त्या प्रेमविवाह करणार असल्याचे सांगितल्याने त्यांना धक्का बसला. त्यांचे आई-वडील या विवाहसाठी तयार नव्हते मात्र त्यांना सुषमा यांनी खूप प्रयत्न करून लग्नासाठी तयार केले, अखेर 13 जुलै 1975 ला कौशल स्वराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकिल होते. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्यांना देशातील सर्वात तरुण अॅडव्होकेट जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. स्वराज कौशल वयाच्या 37 व्या वर्षी मिझोरमचे राज्यपाल देखील झाले. 1990 ते 1993 या काळात त्यांनी हे पद भूषवले.