मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – एक वर्षानंतरही सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Death Anniversary) तपास (Investigation) झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या (Suicide) नव्हती तर त्याचा हत्यारा (Killer) कोण हे सीबीआयने (CBI) जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP spokesperson) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणुक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते.
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे (१/२)#SushanthSinghRajput pic.twitter.com/Il8MF2cXIW— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) June 14, 2021
…म्हणून महाराष्ट्र सरकारला बदनाम केलं
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर भाजपला (BJP) बिहार निवडणूक (Bihar Election) लढवायची होती. म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला (MVA Goverment) बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आलं होतं’ असा गंभीर आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे.
CBI तपासात निष्पन्न काय झालं ?
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) बेछुट आरोप केले होते. एवढंच नाहीतर सीबीआय चौकशीची (CBI inquiry) मागणीही केली होती. पण, वर्षभराच्या तपासानंतर या प्रकरणी सीबीआयच्या हाती काहीच लागले नाही. याच मुद्यावरून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप आणि सीबीआयवर (BJP and CBI) हल्लाबोल केला. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस (Mumbai Police) करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा (FIR) बिहार सरकारने (Government of Bihar) दाखल केला आणि ही केस सीबीआयकडे दिली होती, परंतु निष्पन्न काय झालं ? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
कृपया हे देखील वाचा:
दुर्दैवी ! चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील घटना
भगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम
दुर्दैवी ! भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना