नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपत विधी व्हावा आणि येत्या २४ तासामध्ये म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी व्हावी असे आदेश दिले आहेत. तसेच बहुमत चाचणी दरम्यान मतदान हे गुप्त पद्धतीने होणार नाही तर याबाबत लाईव्ह टेलिकास्ट व्हावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Supreme Court to pass order shortly on the petition jointly filed by the NCP-Congress and Shiv Sena against the formation of BJP-led government in Maharashtra. pic.twitter.com/79GMuaLIMa
— ANI (@ANI) November 26, 2019
पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी करा आणि त्यानंतर लगेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी करावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर इतर पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती, त्याबाबतची आज न्यायालयाने निर्णय दिला आहे.
Supreme Court's three-judge bench, headed by Justice NV Ramana and comprising Justices Sanjiv Khanna and Ashok Bhushan, reading the pronouncement of the judgement on the petition jointly filed by NCP-Congress&Shiv Sena against formation of BJP-led government in Maharashtra. https://t.co/6Gnx5c6bR1
— ANI (@ANI) November 26, 2019
काल झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये भाजपच्या वकिलांनी त्यांच्याकडे राष्ट्रवादीसहित अपक्ष अशा एकूण १७० आमदारांचे समर्थन असल्याचे सांगितले होते. दोनीही पक्षांच्या वतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला गेला होता. त्यानंतर न्यायालयाने अखेर आज 10.30 वाजता या निर्णयाबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे.
Supreme Court orders Floor Test in the Maharashtra assembly to be held on November 27 before 5 pm. The proceedings shall be live telecast. https://t.co/SLrGeF6et1
— ANI (@ANI) November 26, 2019
Visit : bahujannama.com