नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा असा आदेश देत सर्वोच न्यायालयाने केंद्र सरकारला कलम 370 वरून फटकारलं आहे. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना न्यायलयाने हे आदेश दिले आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तिथे परिस्थिती तणावपूर्ण आहे. राज्यात संचारबंदी असून अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवलं आहे.
केंद्र सरकारनं काश्मीरबाबत अॅफिडेविट सादर करावं. लोकांना सर्व सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय काश्मीरमध्ये जाण्या-येण्यावरही आता बंदी घालणार का ? असा प्रश्न करत सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना काश्मीरला जाण्यास परवानगीही दिली आहे. काश्मीर मधील परिस्थीत सुधारा. गरज पडल्यास आपण स्वत: काश्मीर दौऱ्यावर जाऊ असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे.
Chief Justice of India, Ranjan Gogoi, says in Supreme Court "if requirement arises, I may visit Jammu and Kashmir" https://t.co/uiLlcRFu0X
— ANI (@ANI) September 16, 2019
कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीर दौरा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना प्रशासनानं विमानतळावरून परत पाठवलं होतं. आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. आझाद यांनी म्हटलं होतं की, “ज्या राज्यात नातेवाईक आणि कुटुंबीय राहतात तिथे जाता यावं त्यांना भेटता यावं.” सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली आहे.
The Supreme Court asked the Centre and J&K to ensure normal life is restored in Jammu and Kashmir, and to also keep in mind the national safety and security while doing so. https://t.co/ph0VfSCnk0
— ANI (@ANI) September 16, 2019