बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील ममता सरकार यांच्यातील संघर्ष आणखी वाढत चालला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात (Summons )आला होता. एवढेच नाही तर पश्चिम बंगालमध्ये कायदा व्यवस्था बिघडल्याचे भाजपने म्हंटले आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनाही रोखठोक प्रत्युत्तर दिले. मात्र आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सुरक्षेत निष्काळजी झाल्याप्रकरणी केंद्राने पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक व मुख्य सचिवांना दिल्लीत होणाऱ्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांनी कोरोनाचं कारण देत बैठकीला हजर राहण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर तीन आयपीएस अधिकाऱ्यांना दिल्लीत पाठवण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले होते. मात्र, पश्चिम बंगाल सरकारने कोणतंही उत्तर दिलं नाही.
पश्चिम बंगालमध्ये पुढीलवर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आत्तापासून राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस भाजपा व तृणमूल काँग्रेसमधील राजकीय तणाव वाढत असल्याचं दिसत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार व बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्यात पुन्हा संघर्ष उभा राहताना दिसत आहे.
नड्डा यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना राज्यातून कार्यमुक्त करून दिल्लीत पाठवण्याचे निर्देश पश्चिम बंगाल सरकारला दिले होते. मात्र, राज्य सरकारनं त्या पत्राला कोणतंही उत्तर दिलं नाही.त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना समन्स बजावलं होतं. दिल्लीत आज साडेपाच वाजता होणाऱ्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावलं. मात्र, दोन्ही अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचं कारण अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
दरम्यान,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिग बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत त्यांची उपस्थिती अनिवार्य असून, दिल्लीला पाठवू शकत नाही, असं पश्चिम बंगाल सरकारनं केंद्रानं बजावलेल्या समन्स उत्तर दिलं आहे.