बहुजननामा ऑनलाईन टीम : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय वळणांनंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रच्या २९ व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ६.४० वाजता शिवतीर्थावर होणार आहे. मात्र, या महाविकासआघाडी सरकारवर नाराजी व्यक्त करत अभिनेता सुमीत राघवनने ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘सत्ता आली पण पत्ता गेला’, असं म्हणत सुमीतने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
सुमितने ट्विट करत लिहिले कि, ‘गड आला पण सिंह गेला, पण आज म्हणावं लागेल. सत्ता आली पण पत्ता गेला, मातोश्री ते सिल्व्हर ओक’, हॅशटॅग ‘बाळासाहेब ठाकरे’ वापरत एक मतदार म्हणून मला माझी फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या ३ दिवसांत फडणवीस सरकारने राजीनामा दिला. त्यानंतर महाविकासाआघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले. मात्र भिन्न विचारसरणीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत जात उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केल्याने सुमीतने नाराजी व्यक्त केली आहे.
Visit : bahujannama.com