बहुजननामा ऑनलाइन टीम –कसारा : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अमावस्येच्या रात्री गायब झालेल्या तिघांनी अघोरी विद्येमुळे आत्महत्या केल्याच्या चर्चेला आत पूर्णविराम दिला आहे मृत तरुणाचे वडील रमेश घनवट यांनी माझ्या मुलासह तिघांची आत्महत्या(Suicide ) नसून त्यांची हत्याच झाल्याचा संशय आहे. आमच्या मुलांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास पोलीस दिरंगाई करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाने(Suicide ) वेगळे वळण घेतले आहे.
पोलीस यंत्रणा सर्व बाजूने तपास करीत आहे. मृत तरुणांच्या नातेवाइकांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. त्यांच्याकडेही काही माहिती असेल, तर त्यांनीही आम्हाला मदत करावी. आम्ही योग्य तो तपास करून पीडित कुटुंबास न्याय देऊ.असे शहापूरचे उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी सांगितले.