बीड : बहुजननामा ऑनलाईन – संजय ज्ञानोबा ताकतोडे (रा.साळेगाव, ता.केज, जि.बीड) यांनी मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी बीडजवळील पाली तलावात जलसमाधी घेतली. वारंवार महाराष्ट्रामध्ये कित्येक मोर्चे, आंदोलन मातंग समाजाने व संघटनेने केली परंतु महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्यासाठी महाराष्ट्र मातंग परिषदेच्या वतीने जाहिर निषेध करत नातेपुते पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र मातंग परिषद संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे येथे निषेधाचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नानासाहेब रणदिवे,संघटक केरबा लांडगे, संपर्क प्रमुख युवराज रणदिवे, जिल्हाध्यक्ष विनोद लांडगे, शुभम लांडगे, योगेश लांडगे, विशाल लांडगे, एकनाथ लांडगे, प्रमोद लांडगे, वैभव गेजगे, शिवम लांडगे, रोहिदास लांडगे, रघुनाथ खुडे आदी उपस्थित होते.