मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकार स्थापनेच्या पेचात राज्यपालांनी एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तस्थापनेसाठी निमंत्रित केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. सर्वाधीक जागा मिळवणारा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत भाजपला पुरेसं संख्याबळ म्हणजे 145 चा आकडा सिद्ध करावा लागणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रीत केल्यानंतर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपकडे 18 अपक्ष आमदरांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सुधीर मुनगंटीवार हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते त्यावेळी त्यांनी हा मोठा दावा केला आहे. 18 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला असला तरी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी 22 आमदारांची गरज आहे.
शिवसेना आणि भाजपला जनादेश मिळाला आहे. मात्र, शिवसेनासोबत येण्यास तयार नाही. पण आम्हाला दुसरा पर्याय नसून शिवसेनेसोबतच बहुमत सिद्ध करण्याची इच्छा असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान भाजपकडे 105 आमदारांच संख्याबळ आहे. 18 आमदरांचा पाठिंबा मिळाला असेल तर संख्याबळ 123 होते. बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर अजून 22 आमदारांची गरज आहे. बहुमताचा हा आकडा कसा गाठायचा यावर उद्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करु अशी माहिती त्यांनी दिली.
‘त्यांच्याशी’ हातमीळवणी करणार नाही
राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर उद्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यावेळी बहुमताचा आकडा कसा गाठायचा यावर चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो त्यांच्याशी हातमीळवणी करण्याचा प्रश्नच येत नाही. तर बहुमतासाठी आता शिवसेनेने पुढाकार घेणे महत्त्वाचे असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
कोणाच्या दरवाजात जायची गरज नाही
पुढे बोलाताना मुनगंटीवार म्हणाले, इतकच नाही तर स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला कोणाच्या दरवाजात जाण्याची गरज नाही. जनतेने भाजप आणि शिवसेना महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्याही दरवाजात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. मात्र, आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.