बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यसभेतील जागा बदलल्यामुळे संतप्त झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूं यांना पत्र लिहून भाजपप्रणित एनडीएवर जोरदार हल्ला चढविला आहे. राज्यसभेत आपली जागा बदलल्याबद्दल राऊत यांनी व्यंकयांना हे पत्र लिहिले आहे. “राज्यसभेतील त्यांची जागा तिसर्या रांगेतून पाचव्या ओळीत बदलली गेली हे पाहून त्यांना धक्का बसला. शिवसेनेच्या भावना जाणूनबुजून दुखावण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी काही लोकांनी हा निर्णय घेतला आहे. ” असे राऊत यांनी या पत्रात लिहिले आहे.
राऊत पुढे म्हणतात, शिवसेनेने एनडीएमधून माघार घेण्याची कोणतीही औपचारिक घोषणा केली नाही, तरी भाजपने असे पाऊल उचलणे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या निर्णयाचा परिणाम सभागृहाच्या मर्यादेवर झाला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की पहिल्या, दुसर्या किंवा तिसर्या रांगेत जागा द्या आणि सभागृहाची मर्यादा ठेवली पाहिजे. तसेच राज्यसभेचे अध्यक्ष हे पक्षाच्या विचारसरणीपेक्षा उंच आहेत, त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असेही राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना प्रश्न विचारला.
दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरून शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे, त्यात शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची माहिती भाजपतर्फे करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनवर विरोधी बाकड्यावर बसण्याची वेळ आली आहे.