नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५४ एफआयआर दाखल केल्या असून ९०३ लोकांना ताब्यात घेतले किंवा अटक केले आहे. शस्त्र कायद्याअंतर्गत ४१ गुन्हे दाखल केले गेले आहेत. तर दुसरीकडे एक आठवड्यानंतरही तणावपूर्ण वातावरण असून या परिसरात जास्त पोलीस तैनात केले आहेत. हिंसेदरम्यान उपद्रविंनी पाच शस्त्रे प्रामुख्याने वापरली होती. पोलिसांच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे.
पेट्रोल बॉम्ब आणि ऍसिड
दुकाने आणि वाहनांना आग लावण्यासाठी उपद्रविंनी कोल्ड ड्रिंकच्या बाटल्यात पेट्रोल भरत बॉम्ब बनवत त्याचा वापर केला. तसेच त्यांनी ऍसिडला प्लॅस्टिकच्या पाउचमध्ये भरले आणि फेकले.
पिस्तूल आणि बंदूक
आतापर्यंतच्या तपासात ८७ जणांवर गोळ्या लागल्याची पुष्टी झाली आहे. दंगल करणाऱ्यांनी पोलिसांवर आणि लोकांवर गोळीबार केल्यामुळे डझनहून अधिक लोक ठार झाले आणि मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत.
गुलेल
दंगलीच्या वेळी, दरोडेखोरांनी छोट्या-मोठ्या गुलेलचा वापर केला. त्या छतावरही बसवण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी दंगेखोरांनी छोट्या गुलेलचाही वापर केला होता.
चाकू आणि तलवार
पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या शरीरावर चाकूने ४० पेक्षा जास्त वेळा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय इतर अनेक जखमी लोकांवर धारदार शस्त्राने वार केल्याचाही खुणा आहेत.
वीट, दगड आणि रॉड
उपद्रविंनी पोलिस व लोकांवर वीट आणि दगडाने हल्ला केला. यासाठी विटा आणि दगडांनी भरलेली पोती आधीच बर्याच भागात ठेवली होती. याशिवाय रॉड्स आणि पोलही वापरण्यात आले.