नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाची दुसरी लाट आणि लसीकरणादरम्यान जगात ही चर्चा सुरू आहे की, लशीचा प्रभाव किती काळ राहील. याचा आढावा घेणार्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की, लस घेतल्यानंतर अनेक वर्षांपर्यंत कोरोनाच्या गंभीर संसर्गापासून बचाव होऊ शकतो, परंतु संसर्गापासून बचावासाठी एक वर्षानंतर एक बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते. नेचरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, शास्त्रज्ञांच्या एका गटाने कोरोनाच्या सात लशीच्या क्लिनिकल ट्रायलच्या आकड्यांवर अभ्यास केला. ज्याचा हेतू लशीपासून उत्पन्न प्रतिकारशक्तीच्या दूरगामी प्रभावांचा अभ्यास करणे आहे.
संशोधनातील चार निष्कर्ष :
1- लसीकरणानंतर वर्षभरानंतर न्यूट्रीलायजिंग अँटीबॉडी कमी होऊ लागेल ज्यासाठी एक बूस्टर डोस घ्यावा लागेल.
2- बूस्टर डोस न घेता सुद्धा अनेक वर्षापर्यंत कोरोनाच्या गंभीर संसर्गापासून बचाव होईल.
3- जर न्यूट्रीलायजिंग अँटीबॉडी कमी आढळली तरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यात उपयोगी पडेल.
4- जर एखाद्या लशीचा प्रभाव 50 टक्के आहे, तरी सुद्धा कोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीच्या तुलनेत 80 कमी अँटीबॉडी बनते. तरी सुद्धा ती मोठ्या प्रमाणात बचाव करते.
फायजर-मॉडर्नाची लस बनवते जास्त अॅटीबॉडी
संशोधनाचे सह लेखक आणि सिडनी युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलाजिस्ट जेम्स ट्रायकस म्हणाले, फायजर, मॉडर्ना एमआरएन लस जास्त अँटीबॉडी निर्माण करते, तर एस्ट्राजेनेकाची लस कमी अँटीबॉडी उत्पन्न करते. परंतु एक वर्षानंतर सर्वात घट होईल आणि तेव्हा एक अतिरिक्त बुस्टर डोस पुन्हा त्यास वाढवू शकतो.