नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचा विरोधी पक्ष एका मंचावर येऊन भाजपविरोधी टाळ कुटण्याची तयारी करत असून बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे लखनौला गेले असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारवर आरोप लावत ते लोकांना धर्माच्या आधारे विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर बनवण्यासाठी आर्थिक मदत केली जात असून बाबरी मस्जिदला पाडले त्याला बनवायला कोणतीही मदत केली नाही. बाबरी मस्जिद बनवायलाही मदत दिली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
लखनऊच्या रवींद्रालय येथे एनसीपीच्या राज्य प्रतिनिधी संमेलनाला संबोधित करत युपी सरकारच्या बजेटवरही निशाणा साधत त्यात शेतकऱ्यांसाठी काही नसल्याचे म्हटले. बेरोजगारांना मासिक प्रशिक्षण भत्ता देण्याचे तरतूद केली होती. पण तेही मिळेल की नाही हे सांगता येत नाही. तरुणांना कष्ट करण्याचा अधिकार दिला पाहिजे. अशा प्रकारे भत्ता देण्याने काम होणार नाही. आज युपी आणि पूर्ण देशातील शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असून त्यात बदल करायला एनसीपीच्या कार्यकर्त्यांना बिगुल फुकले पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले.
पुढे पवार म्हणाले की, युपीमध्ये बेरोजगारी असून मोठ्या संख्येत तरुणांना महाराष्ट्रासह दुसऱ्या राज्यात जाण्यास मजबूर होत असून भाजप सरकारच्या धोरणांमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे त्यांना जनता सत्तेतून काढून टाकेल. दिल्लीत स्वतः पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत गृहमंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्र्यांचा प्रचार करायला गेले होते. पण जनतेत अरविंद केजरीवाल यांना प्रचंड बहुमतांनी विजयी केले. महाराष्ट्राप्रमाणे युपी आणि इतर राज्यात विरोधी पक्षांना एकजूट करत भाजप सरकारला सत्तेतून हाकलून लावेल.
भाजपच्या लोकांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा, त्यांचे हे धोरण जनतेला चांगलेच समजले असून ते त्यांच्या जाळ्यात फसणारे नाहीत. सीएए आणि एनआरसीमध्ये त्रुटी असून त्यात मुस्लिम अप्लासंख्याकांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे, असेही पवार म्हणाले आहेत.