नवी दिल्ली : वृत्तसंस्था- काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या ‘नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा बना’ या आवाहनाचा परिणाम आता दिसून येतो. कोणत्याही कंपनीत काम करण्याऐवजी तरुण आता स्वतः कंपनी तयार करण्यास प्राधान्य देत आहेत. २०१५ पासून जवळपास २३ हजार तरुणांनी आपल्या कंपनीची मालकी घेतली आहे. उद्योग मंत्रालयाच्या मागील आकडेवारीमध्ये मागील वर्षी २० हजारांपेक्षा कमी स्टार्टअप्स होते. परंतु आजचे तरुण नवीन कल्पना घेऊन कंपनी सुरू करत आहेत. एवढेच नव्हे तर आतापर्यंत अडीच दशलक्षाहून अधिक लोकांना नोकर्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर स्टार्टअप इंडिया मोहिमेचे हेच चित्र समोर आले आहे.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या देशात २३ हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. एका स्टार्टअपमध्ये साधारणत: १२ जणांना रोजगार उपलब्ध होऊन सुमारे तीन लाख तरुणांना रोजगार मिळाला आहे. पीएम मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१५ रोजी लाल किल्ल्यावर स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली. या योजनेंचे ध्येय केवळ तरुण उद्योजक तयार करणे नव्हे तर तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या हे होते. सरकारने यासाठी सुरुवातीपासूनच १० हजार कोटींचा निधी स्थापित केला आहे. याअंतर्गत, तरुण उद्योजकांना तीन वर्षांच्या करातून सूट देण्यात आली आहे आणि पहिल्या ३ वर्षांत कोणतीही चौकशी झालेली नाही.
दरम्यान, परकीय गुंतवणूक ही अडचण ठरणार नाही, कारण परदेशी गुंतवणूकही भारतीय स्टार्टअप्समध्ये येते. त्यासाठी केंद्र सरकार सतत अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असते. मोदी सरकार ‘स्टार्टअप मुव्हमेंट’ अंतर्गत तरुण उद्योजकांना प्रारंभापासूनच प्रोत्साहन देत आहे. सॉफ्टवेअर दिग्गज आयबीएमने २०१७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, भारतातील अर्थसहाय्य अभाव हे एक प्रमुख कारण आहे. पहिल्या ५ वर्षांत ९० टक्के पेक्षा जास्त स्टार्टअप्स हार मानतात. तर, अशा परिस्थितीत पीएम मोदी यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय स्टार्ट अपने बर्यापैकी लोकांना नोकर्या दिल्या आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक ३,७६१ स्टार्टअप्स आहेत. यापैकी ४९,४८२ लोकांना नोकर्या मिळाल्या आहेत.
कर्नाटकात २,९१९ स्टार्टअप्स आहेत. ज्यामध्ये ३८,८२८ लोक कार्यरत आहेत.
दिल्लीत २,६१६ स्टार्टअप्स आहेत आणि ३६,४०३ लोक नोकरी करतात.
उत्तर प्रदेशमध्ये १,६०७ स्टार्टअप्स आहेत, त्यापैकी २२,८१५ जणांना नोकरी मिळाली आहे.
हरियाणा येथे १,०८६ स्टार्टअप आहेत आणि त्यात १७,१८२ लोकांना नोकरी मिळाली आहे.
तेलंगणामध्ये १,१०३ स्टार्टअप्स कार्यरत आहेत, १९, १८१ तरुण कार्यरत आहेत.
Visit : bahujannama.com