नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतक्या दिवसांपासून रखडलेल्या महाशिवआघाडीच्या निर्णयाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अखेर मंजुरी दिली आहे. त्यांच्या या मंजुरीमुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची चित्र स्पष्ट झाले असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापनेची शक्यता वर्तविली जात आहे. आज काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर आता पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे.
त्यामध्ये सत्तेच्या वाटाघाटी, कॉमन मिनिमम प्रोग्रॅम भिविष्यातील निवडणूका यावर चर्चा करण्यात येईल.विधानसभेचा निकाल लागून जवळपास महिना उलटला तरी बहुमत मिळालेल्या महायुतीला सरकार स्थापन करता आले नाही. त्यामुळे भाजपची साथ सोडत शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादीकडे सत्ता स्थापनेसाठी पाठींब्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर आज सोनिया गांधी यांच्या निवास्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाशिवआघाडीसाठी सोनिया गांधी यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या २-३ दिवसात सत्तास्थापन होणार असल्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वात १ डिसेंबरला सरकार स्थापन होईल : राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन करणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे. त्यात आता सोनिया गांधी यांनी मंजुरी दिल्याने राज्यात लवकरच नवे मुख्यमंत्री शपथ घेतील, असे दिसून येत आहे.
Visit : bahujannama.com