नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली असून सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी माफी मागण्याची मागणी भाजपने केली आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करत समझोता एक्सप्रेसच्या स्फोटावेळी काँग्रेसने हिंदू दहशतवाद असा शब्द वापरला होता, असे संबित पात्रा म्हणाले. तसेच १९४९ मध्ये काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराचा विरोध केला तेव्हापासून आजपर्यंत राम मंदिर उभे राहिलेले नाही. काँग्रेसने नेहमी हिंदू विरोधात काम केले असून मुस्लिमांना गोंजारण्यासाठी काँग्रेसने हिंदूंचा अपमान केला. मुस्लिमांचाही राजकारणासाठी वापर केला जातो. त्यामुळे काँग्रेसचे नाव INC नाही तर MLC करायला हवे. मुस्लिम लीग काँग्रेस असे नाव करावे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
The Congress party should be renamed from Indian National Congress to MLC – Muslim League Congress. They only talk about Muslims and try to polarize them: Shri @sambitswaraj
— BJP (@BJP4India) January 22, 2020
2008 में समझौता एक्सप्रेस विस्फोट में कांग्रेस के शीर्ष नेतृत्व ने हिंदू आंतकवाद पर उंगली उठाई।
2006 में मनमोहन सिंह ने कहा कि देश के संसाधनों पर पहला हक मुसलमानों का है।
2004 में सोनिया जी ने कांची कामकोटि के शंकराचार्य को गिरफ्तार कराया: श्री @sambitswaraj
— BJP (@BJP4India) January 22, 2020
तसेच हिंदूंच्या विरोधात वातावरण पेटवले जात असून लोकशाहीच्या देशात एका धर्माला टार्गेट केले जात आहे. मुस्लिमांमुळे सत्तेत उतरलो, या विधानावरून सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे तर आव्हाडांनी हिंदूंबाबत जे बोलले त्यावरून शरद पवार यांनी माफीची मागणी भाजपने केली.
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड “मुस्लिम त्यांचे पूर्वज कुठे दफन केले गेले होते, ते मुस्लिम सांगू शकतात परंतु त्यांच्या हिंदू पूर्वजांचे अंतिम संस्कार कोठे झाले हे हिंदू सांगू शकणार नाहीत,” असे म्हणाले होते. त्यावर हे इतके अपमानजनक असून हे राजकारणाचे कोणातरी रूप आहे ? असा प्रश्नच संबित पात्रा यांनी यावेळी केला.
NCP leader Jitendra said: "Muslims can say where their forefathers were engraved but Hindus won't be able to tell where the last rites of their forefathers happened."
This is so demeaning. What form of politics is this?: Shri @sambitswaraj pic.twitter.com/ZKSyNqdyNp
— BJP (@BJP4India) January 22, 2020
Visit : bahujannama.com