नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास महायुती असमर्थ ठरल्याने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी केंद्रस्थान बनली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु या दोन्ही नेत्यांनी सत्ता स्थापनेच्या विषयावर मौन बाळगले आहे. यासंदर्भात बुधवारी सोनिया गांधींना विचारले असता, सोनिया यांनी मोजकेच उत्तर दिले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून महाराष्ट्रातील सरकारचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल, याबद्दल विचारले असता त्यांनी ‘नो कमेंट’ असे उत्तर देत यासंदर्भात बोलणे टाळले.
पवार म्हणाले- तुम्ही मला का विचारता ?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सोनिया गांधींना यांची दिल्लीत भेट घेतली. बैठकीनंतर त्यांना सरकार स्थापनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, तुम्ही मला का विचारता, या संदर्भात भाजप आणि शिवसेनेशी चर्चा करा, मला सरकारबद्दल काय माहित आहे ? हे कधी आणि कधी बनवले जाईल. मी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढल्या, म्हणून बैठकिला आलो होतो. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत सतत सरकार स्थापनेचा दावा करत आहेत. लवकरच सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. नुकताच त्यांनी त्या दोन दिवसांत सरकार स्थापनेचे चित्र स्पष्ट होईल, असा दावाही केला आहे.
शिवसेनेचा दावा – २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार शपथ घेणार :
दुसरीकडे, शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यातील सरकारचा शपथविधी सोहळा २५ किंवा २६ नोव्हेंबर रोजी होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. सत्तार म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व ५६ आमदारांना मुंबईत बोलावले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पाच ते सहा दिवसांचे कपडे आणण्याचे आदेश दिले आहेत. या दिवसात सर्व आमदार मुंबईतच राहणार आहेत.
Visit : bahujanama.com