उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – सोनभद्र हत्याकांडाचा भयानक देखावा समोर आला असून ३२ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ३०० पेक्षा जास्त हल्लेखोर आले. त्यांच्या हातात बंदूक आणि दांडके होते. काहीच वेळात त्या हल्लेखोरांनी लोकांवर हल्ला केला. गोळ्यांच्या आवाजात लोक ओरडू लागले. लोकांच्या ओरडण्याचा आणि बायकांच्या रडण्याचा आवाज सुरु झाला. थोड्याच वेळात शेतात सर्वत्र रक्ताने भरलेले मृतदेह दिसून आले. सोनभद्र जमिनीवरील चाललेला वाद हा सोन्यासाठीच चालला नसून त्याच्या जमीनीमुळेही चर्चेत राहिला आहे. या हत्याकांडाने देश हादरला आहे. ७ जुलै २०१९ ला उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील जमिनीच्या वादामुळे अनके लोकांचे प्राण गेले आहेत. यात १० लोकांचा मृत्यू झाला असताना दोन डझनपेक्षा जास्त लोकांचा जीव धोक्यात आला होता.
लोकं घाबरत-घाबरत आपल्या घरी राहत होते. त्यावेळच्या रक्तरंजित हत्याकांडाचा भयानक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात २०० पेक्षा अधिक हल्लेखोर हातात बंदुका, दांडके घेऊन हल्ले करताना दिसत असून शेतात उपस्थित असलेले लोक पळताना दिसतात. या हत्याकांडात १० लोक ठार झाले तर २८ पेक्षा जास्त लोकं जखमी झाले. या प्रकरणानंतर पोलिसांनी सुमारे ३० लोकांना अटक केली अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा वाद त्यावेळी ९० एकर जमीनीचा असताना त्यासाठी दोन बाजू समोरासमोर होत्या.
या हत्याकांडात सुमारे ३०० लोकांनी मिळून १० लोकांना ठार केले. असे म्हटले जाते की, ९० एकर जमीनीवरील हा वाद खूप जुना असून त्याची सुरुवात २०१७ मध्ये झाली होती. घोरावल कोतवाली परिसरातील उभा गावच्या प्रमुखांनी ९० एकर जमीन खरेदी केली असताना विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला. ती जागा विरोधी पक्षाच्या ताब्यात असल्याचे विरोधी पक्षाच्या लोकांनी सांगितले. त्यामुळे गावाच्या प्रधानांनी जमिन तर खरेदी केली पण पण त्यावर ताबा घेता आला नाही. हे सहन न झाल्याने ७ जुलैला प्रधान यांनी आपल्या समर्थकांसह उभा गावात आदिवासी शेतकर्यांवर ट्रॅक्टर घेऊन हल्ला केला. हल्ल्यात ३ महिलांसह १० जणांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाले.