बहुजननामा ऑनलाईन टीम – शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केली. ही घटना झरी तालुक्यातील खापरी येथे गुरुवारी सकाळी घडली आहे. एवढेच नाही तर मुलाने हत्येनंतर वडिलांचे मांस कुत्र्याला खाऊ घातले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दत्तू आणि नामदेव हे झरी तालुक्यातील खापरी येथील रहिवासी होते. दत्तू आणि नामदेव यांच्यात शेतीच्या हिस्सेवाटणीतून वाद चालू होते. दत्तूला आपण जिवंत असे पर्यंत शेतीची वाटणी करायची नव्हती. पण नामदेवला शेतीमधील आपला वाटा हवा होता.
या विषयावरून त्यांच्या दोघात नेहमी वाद होत असे. नेहमी प्रमाणे मुलगा नामदेव याने वडील दत्तू आणि आई सोबत रात्रीचे जेवण केल्यानंतर नामदेवाचे आई- वडील झोपण्यासाठी गेले. याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास नामदेव याने वडील दत्तूच्या डोक्यता काठीने वार केले. हा वार इतका घातक होता त्यामुळे दत्तू यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यू नंतरही नामदेव शांत न बसता वारंवार त्यांच्या डोक्यात काठीने वार करतच होता. यांनतर त्याने वडीलांचे मांस कुत्र्याला खाऊ घातले. या थरारक घटने बाबत गावकऱ्यांना कळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अमोल बारापात्रे यांनी घटना स्थळी पोहचत आरोपी नामदेवला अटक केली.