बहुजननामा ऑनलाईन टीम : केंद्र सरकारने कृषी कायदे मागे मागे घ्यावेत, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कायदे रद्द झाल्याशिवाय येथून हलणार नाही, अशा पवित्रा घेत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याच दरम्यान सिंघू बॉर्डरवर शकील मोहम्मद कुरेशी कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना मोफत स्वेरट वाटप करत शेतक-याप्रति असलेला आदर व्यक्त करत आहेत.
मोहम्मद कुरेशी दररोज सकाळी आठ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचे वाटप केले आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात.
कुरेशी यांचे वडील हे उत्तर प्रदेशातील बागपत येथील शेतकरी आहेत. माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. ते आपली पत्नी आणि मुलांसह उत्तर दिल्लीतील नरेला येथे राहतात. कुरेशी यांनी गरम कपड्यांच्या किंमतीविषयी काही बोलायला नकार दिला. हे चांगल्या कामासाठी माझे योगदान आहे असे देखील त्याने म्हटले आहे.
सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी समाजातील विविध वर्गांमधून विविध प्रकारची मदत पोहोचत आहे. काही व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटना लंगर आयोजित करत आहेत, तर काही दररोज लागणाऱ्या गरजा भागवण्याचे काम करत आहेत. काहींनी तर वैद्यकीय शिबिरे देखील लावली आहेत. काही लोक तर भांडी घासण्याचे काम करत आहेत, तर काही कचरा देखील साफ करताना दिसत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.