बहुजननामा ऑनलाइन टीम – हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा अमीर खान स्ट्रगल करीत होता. तेव्हा आमिरचा एक चित्रपट आला होता ‘होली’ मात्र तेव्हा कोणी या चित्रपटाची दखल घेतली नाही. आमीर खानचा तुलत भाऊ मनसूर खान यांनी नासिर हुसेन यांच्या सोबत चर्चा केली की, आमीरला लाॅंन्च केले पाहिजे. त्याचे करियर बनिविने आपली जबाबदारी आहे. त्यावेळी नासिर हुसेन यांना पण आपल्या पोराचे म्हणजे मनसूर खान यांचे बोलने पसंत आले. तेव्हा निर्णय घेण्यात आला की, एक कमी बजेटचा चित्रपट बनवायचा आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन मनसूर खान यांनी करायचे. यावेळी नवी अभिनेत्री जुही चावलाची निवड करण्यात आली. आणि कमी बजेट मध्ये चित्रपट तयार करण्यात आला.
चित्रपट झाल्यानंतर वेळ आली प्रमोशनची यासाठी जास्त पैसे खर्च करणार नव्हते कारण बजेट कमी होता. मात्र प्रमोशन करणे गरजेचे होते. तेव्हा प्रमोशनची जबाबदारी आमीरने स्विकारली आणि निर्णय घेण्यात आला की मुबंईतील ऑटो रिक्षावर चित्रपटांचे पोस्टर लावायचे. तेव्हा आमीर आपल्या मित्रांना घेऊन निघाला आणि मिळेल त्या रिक्षाला पोस्टर लावण्याचे काम चालू केले. यावेळी ड्रायवरला सांगत होते की मी या सिनेमाचा अभिनेता आहे. तेव्हा ड्रायव्हर पण आमीरकडे बघून चित्रपट बघण्याचे वचन देत होते. दरम्यान एका रात्री आमीर व त्याचे मित्र पोहचले बॅंन्ड्रा स्टेशनवर जेथे रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या. ऑटोवर पोस्टर चिकटविने सुरु झाले. तेव्हा एक रिक्षावाला आला आणि पोस्टर का लावलेस म्हणून तो आमिरवर भडकला. आमिरने त्या रिक्षावाल्यास माफी मागितली. मात्र तरी पण रिक्षावाला शिव्या देण्यास चालू झाला हे सर्व बघून आमीरचे मित्र धावत आले. व रिक्षावाल्यास समजावले भांडण थांबले मात्र रिक्षावाल्याने ते पोस्टर आमीरच्या समोर फाडून टाकले. हे बघून आमीर दु:खी झाला. मात्र जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा या चित्रपटाने 8 फिल्मफेयर व 2 नॅाशनल पुरस्कार पटकावले.