मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सचिन वाझे प्रकरण आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर रोखठोकच्या माध्यमातून बाण चालवले आहेत. तसेच राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्न विचारले आहेत. सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवून सहा महिने झाले, पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ठाकरे सरकार जायची वाट पाहत आहेत.
हा घटनात्मक भंग आहे, असे गणित राऊत यांनी मांडले आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत 12 आमदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत मी राज्यपालांवर टीका करणारच असेही राऊत यांनी यापूर्वीच म्हटले आहे. परमवीर सिंग आणि वाझे प्रकरणावरुन सरकारच्या डॅमेज कंट्रोलचा फज्जा उडाल्याचे राऊत यांनी रोखठोक या सदरातून म्हटले आहे. तसेच राज्यपाल कोश्यारीनी या सर्व काळात नेमके काय केले? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात ठेवून बसले आहेत.
अंबानी स्फोटक प्रकरण, परमबीर सिंग लेटर प्रकरणात तरी हे सरकार जाईलच या आशेवर ते होते. त्यावरही पाणी पडले. पुन्हा भाजप नेते ऊठसूठ राज्यपालांना भेटतात. सरकार बरखास्तीची मागणी करतात. त्यामुळे राजभवनाची प्रतिष्ठाही काळवंडली आहे. देशमुख, वाझे, परमबीर यांचे पत्र या सर्व घोळात सरकारचा पाय नक्कीच अडकला. तो पुन्हा अडकू नये. अधिकाऱ्यांनी सरकारला अडचणीत आणले, वाझे हा साधा फौजदार, रश्मी शुक्ला ज्येष्ठ आयपीएस, परमबीर हे त्यापेक्षा ज्येष्ठ अशा अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे. आपल्याच मर्जीतले अधिकारी नेमण्याचा पायंडा नव्याने पडला. मात्र हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.