बहुजननामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वादळ २०१४ मध्ये सुरु झाला आणि राजकारणाचे चित्रच पालटून गेले. आता याच दरम्यान अनेक घराण्यांतील सदस्य सध्या पक्षांतराच्या मार्गावर आहे. त्यात मोठ- मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते. अशाच या पक्षाला पक्षांतराचा धोका बसला आहे. या पक्षांतरामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता जास्तच वाढली आहे.
२०१९ पर्यंत २०१४ मधील मोदींची लाट ओसरेल अशी सर्वांची भावना होती. यासाठी विरोधकांनी लोकसभेत जय्यत तयारी केली होती. परंतु मोदी लाटेमुळे देशात कोणतीच लाट टिकू शकली नाही. आणि याचा परिणाम नांदेडमध्ये दिसून आला. नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, या पराभवामुळे इतर नेत्यांचे काय होणार अशी भावना निर्माण झाली. यामुळे विधानसभेला तिकीट मिळेल पण विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतराचा मार्ग निवडत आहेत. नेत्यांची पक्षांतराचे अनेक कारणे आहेत. तर काहींनी भीती पोटी पक्षांतराचा मार्ग निवडला आहे.
या नेत्यांनी सोडली राष्ट्रवादी
अशा या पक्षांतराचा सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. २० नेत्यांनी राष्ट्रवादीतून पक्षांतर केले आहे. यामध्ये शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते, किसन कथोरे, राहुल कूल, सचिन अहिर, कपिल पाटील, निवेदिता माने, लक्ष्मण ढोबळे, संजय सावकारे, विनय कोरे, लक्ष्मण जगताप, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील, बाबासाहेब देशमुख, सुरेश धस, प्रशांत परिचारक, जयदत्त क्षीरसागर, विजयकुमार गावीत, पांडुरंग बरोरा, विजयसिंह मोहिते पाटील, चित्रा वाघ,वैभव पिचड या नेत्यांचा समावेश आहे.
हे नेते राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत
तर दुसरीकडे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांची यादी देखील मोठी आहे. या यादीत संग्राम जगताप, अवधुत तटकरे, राणाजगजितसिंह पाटील, संदीप नाईक, दिलीप सोपल आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहेत.