बहुजननामा ऑनलाईन – साप हा खूप विषारी आहे. तो जर चावला तर त्याचे विष पुर्ण शरीरामध्ये पसरते मग व्यक्तीची परिस्थिती गंभीर होऊन जाते. पण तुम्ही हे एकले का ? की माणसाने सापाला चावले. नाही ना… अशीच घटना नुकतीच एका गावात घडली आहे. हे एकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल यात शंकाच नाही. कारण एका गावातील व्यक्तीने रागाच्या भरात सापाला चावून मारले आहे. ही आश्रर्यचकीत घटना घडली आहे ती म्हणजे एटा जिल्ह्यातील ठाणे कोतवाली देशातील असरुली गावामध्ये. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
एटा जिल्ह्यातील ठाणे कोतवाली देशातील असरुली गावचे हे आश्चर्यकारक प्रकरण आहे. दारू पिऊन एक तरुण व्यक्ती घराबाहेर पडला तेव्हा वाटेत त्याला विषारी साप चावला. साप चावल्यामुळे तो व्यक्ती खूप चिडला आणि त्याने दारुच्या नशेत साप पकडला आणि त्याचे दाताने तीन तुकडे केले. यानंतर त्याचे नातेवाईक त्याच्याजवळ आले आणि त्यांनी सापाचे तुकडे पिशवीत ठेवून भरून ते दवाखान्यात नेले. हे आश्चर्यकारक प्रकरण उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्याचे आहे.
त्या युवकाने रागाच्या भरात सापाचे तीन तुकडे करुन त्याला मारुन टाकले. सापाचे दाताने तीन तुकडे करुन मारल्यामुळे युवकाच्या शरीरामध्ये सापाचे विष पसरत चालले होते. त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सापाचे विष पसरल्याने त्याच्या परिवाराने गंभीर अवस्थेत या तरूणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याची गंभीर अवस्था पाहून त्याला आगरा येथे नेण्यात आले तिथेच मृत सापाचे अंतिमसंस्कार त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केले.