वाराणसी : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करताना केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेसवर आरोप केले आहेत. ईराणी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबाबत वक्तव्य केले. इंग्रजांनी भारताचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसने देशाची फाळणी करण्याला सहमती दर्शवली कारण त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान व्हायचे होते, देशाची फाळणी ही देश हितासाठी नव्हे तर कुटुंबासाठी झाली होती, असे ईराणी यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
स्मृती ईराणी म्हणाल्या, 19 जानेवारी 1990 ला पाकच्या इशार्यानंतर जम्मू-काश्मीरमधून पंडिताना बाहेर काढण्यात आले. तो दिवस इतिहासातील काळा दिवस होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बापूंच्या विचार स्वीकारले आहेत. भारतातील जनतेने जगाला दिलेले वचन पूर्ण करण्याचे काम मोदी करत आहेत. नागरिकत्व संशोधन कायद्यासाठी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारांना आशीर्वाद दिले आहेत. मुलींच्या हक्कासाठी मोदी यांनी जो कायदा आणला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असेही स्मृती ईराणी म्हणाल्या.
काँग्रेसवर टीका करताना स्मृती ईराणी म्हणाल्या, पाकिस्तानात हिंदू मुलींवर बलात्कार झाला, तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले. या घटनेवर काँग्रेसने एक शब्दही काढला नाही. पण पाकमध्ये ईसाईंच्या धार्मिक स्थळावर बॉम्बहल्ला झाल्यानंतर सोनिया गांधींना रडू आले नाही. मात्र, बाटला हाऊस कांडावर त्यांना अश्रू अनावर झाले होते.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा