मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अर्थसंकल्पात महिला व बालकांच्या पोषण आहारासाठी भरीव तरतूद केली आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आकडेवारीसह सांगितले यावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारला चांगेलच धारेवर धरले आहे. ते म्हणाले, प्रत्येक महिन्याला १ लाख ५२ हजार महिलांना आठवड्यातून ६ वेळा चौरस आहार देण्यात येतो. तसेच ८.३७ लाख बालकांना आठवड्यातून चार वेळा अंडी, केळी असा पोषण आहार दिला जात असेल, तर गेल्या दोन वर्षांत राज्यात ३३,६०१ बालकांचा मृत्यू झालाच कसा ? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विचारला आहे. त्यांनी विधानसभेत बोलताना सरकारला चांगलेच धारेवर धरले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत आ. पाटील यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. महिला व बालकांच्या पोषण आहाराचा हाच धागा पकडत आ. पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मागील दोन वर्षात ३३,६०१ बालकांचा मृत्यू कसा झाला, असा सवालही त्यांनी केला. २० हजार २९२ कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या सरकारने एवढ्या मोठ्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल सगळ्या आमदारांना पार्टी दिली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
– सरकारला विचारले हे प्रश्न ?
पोषण आहार मिळूनही गेल्या दोन वर्षांत राज्यात ३३,६०१ बालकांचा मृत्यू झालाच कसा ?
पाच वर्षांत किती नवीन सरकारी नोकऱ्या निर्माण झाल्या ?
गेल्या पाच वर्षांत पेट्रोल डिझेलचे दर का कमी झाले नाहीत ?
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात किती नवीन उद्योग सुरु झाले ?
गेल्या पाच वर्षांत महागाई का कमी झाली नाही ?
१८ हजार ६४९ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली मग पंचवीस हजार गावांमध्ये दुष्काळ का ?