नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमध्ये बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने या सहा राज्यांमध्ये आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्देश दिले आहेत. दिल्लीच्या हस्तसाल विलेजच्या डीडीए पार्कमध्ये सुद्धा 16 पक्षांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे वृत्त त्यांचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
एका अधिकृत वक्तव्यानुसार, आतापर्यंत सहा राज्यात (केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात) संसर्गाची पुष्टी झाली आहे. केरळच्या दोन प्रभावित जिल्ह्यांत पक्षी मारण्याचे अभियान संपले आहे. संसर्ग मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वक्तव्यात म्हटले आहे की, आतापर्यंत एव्हियन इंफ्लूएंजा (एआय) दूर असलेल्या राज्यांना सुद्धा पक्षांच्या आकस्मिक मृत्यूबाबत सतर्क राहणे आणि तात्काळ माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे, जेणेकरून कमी वेळात योग्य पावले उचणे शक्य होईल. प्रभावित राज्य केरळ, हरियाणा, हिमाचल प्रदेशचा दौरा करण्यासाठी केंद्रीय पथके गठित करण्यात आली आहेत, जी स्थितीवर लक्ष ठेवून महामारी संबंधी आवश्यक तपसणी करतील.