बहुजनननामा ऑनलाईन – देशातील अनेक राज्यात मॉब लिंचिंगची घटना घडलेली तुम्ही ऐकली असेल. अशीच एक घटना राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात घडली आहे. राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यामध्ये एक हवालदार जमिनीच्या प्रकरणाचा तपास करून घरी जात असताना काही लोकांनी त्याच्यावर लाठीचार करुन निर्घृणपणे मारहाण केली.
राजसमंद उपविभागातील बेरार ग्रामपंचायतीच्या रातिया थाक गावात ही घटना घडला आहे. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या हवालदाराचे नाव अब्दुल गनी आहे. तो ४८ वर्षांचा होता. या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या हवालदाराला तेथील नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. हवालदार गंभीररित्या जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक राजेंद्र सिंह, सीआय लभुराम विश्नोई घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली.
Rajesh Gupta, Additional SP on a Head Constable's death in Bhim, Rajsamand: Prima facie it appears that unknown miscreants beat him up while he was investigating a case, he received a severe injury on his head that led to his death. No arrests yet, probe underway(13.7) #Rajasthan pic.twitter.com/sysHdjATvn
— ANI (@ANI) July 13, 2019
या घटनेबद्दल पोलिस अधिकारी म्हणाले की, जेव्हा हवालदार अब्दुल गनी दुचाकीवरून घरी परत जात होते तेव्हा चार-पाच अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते खूप जखमी झाले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात सामील झालेल्या लोकांचा पोलीस तपास करीत आहे.