मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने ‘शिवभोजन’ थाळीबाबत काही घोषणा केल्या होत्या. गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्याच्या ठाकरे सरकारच्या महत्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेसाठी आधार कार्डाची सक्ती करण्यात आली आहे, अशी बातमी माध्यमांमध्ये पसरली होती. पण ती अफवा असल्याचे मुख्यमंयत्री कार्यालयाकडून स्पष्ट केले गेले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवथाळी योजनेचा फायदा गरिबांनाच मिळावा आणि या योजनेचा गैरफायदा कोणी घेऊ नये याची काळजी घेणार असल्याचे सांगितले आहे. पण या थाळीसाठी फोटो व आधार कार्ड दाखवावे लागेल, अशी बातमी पसरली होती. पण आता मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत स्पष्टता व्यक्त केली आहे.
10 रुपयात जेवणाची थाली … असे समजते की तेथेही खुप अट्टी शर्थी आहेत . आहो गरीबाला जेवू घालताय .. का त्याची थट्टा करताय . आमची मागणी आहे बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे .
@OfficeofUT pic.twitter.com/1fIcR8lpea— Ram Kadam (@ramkadam) January 22, 2020
यादरम्यान विरोधकांनी सरकारच्या या योजनेवर टीका केली. यावर भाजपचे राम कदम यांनी आपल्या ट्विटरवरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘गरिबाला जेवू घालताय, का त्याची थट्टा करताय,’ असा प्रश्न कदम यांनी केला आहे. तसेच “१० रुपयात जेवणाची थाळी… असे समजते की तेथेही खूप अटी-शर्ती आहेत. अहो गरिबाला जेवू घालताय की त्याची थट्टा करताय? आमची मागणी आहे. बिनशर्त सर्वांना जेवण मिळालेच पाहिजे,” असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे.
— Ram Kadam (@ramkadam) January 22, 2020
“बिनशर्त, सरसकट अशा शब्दांचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरु केलीये. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे,” असेही ट्विट केले आहे.