मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. या भेटीबाबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे एक दिवस मातोश्रीवर देखील येतील, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
एकमेकांकडे जात राहिलं पाहिजे
संजय राऊत म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, ते मित्र आहेत आणि राहतील. काल ते खडसे यांच्या घरी गेल्याचे पाहून मला चंगलं वाटलं. त्यापूर्वी ते शरद पवार यांच्या घरी गेले. विरोधी पक्ष जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत. मात्र लोकशाहीत संवाद असला पाहिजे, महाराष्ट्रात ही परंपरा आहे. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील तर स्वागत करायला पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. एकमेकांकडे जात राहिलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
त्यांना तीन वर्षे टीकाच करायची आहे
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन वर्षे टीकाच करायची आहे. सत्ताधारी नेते, मंत्री यांच्यावर टीका करणं हे विरोधी पक्षनेत्यांचे कामच आहे. लोकशाहीमध्ये टीका स्वीकारली पाहिजे. त्यांनी काय टीका केली मला माहित नाही, पण त्यांनी कोरोना संकटात महागाई, वादळ, मदत योजना याबाबत बोलले पाहिजे. विरोधी पक्षाने राज्याच्या हितासाठी सरकारसोबत काम करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.
माझ्यामुळे सत्ता गेल्याचं दु:ख
संजय राऊत पुढे म्हणाले, फडणवीस यांचे दु:ख समजून घेतलं पाहीजे. माझ्यामुळे सत्ता गेल्याची वेदना आहे. मी त्यांचं दुःख समजतो. त्यामुळे मी त्यांचे आरोप, टीका समजून घेतो, असा टोला त्यांनी लगावला. निवडणुका होतील तेव्हा एकमेकाशी लढत राहू, संघर्ष करु. लोक कौल देतील तो स्विकारु. पण मग आता कशासाठी वाद निर्माण करत आहेत ? असा सवाल त्यांनी केला आहे.
‘या’ अभिनेत्रीच्या सांगण्यावरून धर्मेंद्र यांनी सोडली होती दारू; फसलात ना, तुम्हाला काय वाटलं हेमा मालिनी
देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले – ‘कोरोना संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू’
खा. इम्तियाज जलील यांचा महिला पोलिसाच्या हातावर फटका, FIR दाखल
शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !
सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द