मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले. हा इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात (Eknath Shinde Group) नाही. ज्यांना भाजपाचा पुळका होता ते पराभूत झाले. शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) लोकशाहीची भीती आहे. बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केलीय. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल,’ असा घणाघात राऊत यांनी केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
“बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान आहे. तुम्ही शिवसेना सोडली आहे. शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. स्वत:च्या हिमतीवर निवडून या. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा. शिवसेनेच्या पंखाखाली का येताय? जर स्वाभिमानासाठी बाहेर पडलाय तर शिवसेनेशिवाय स्वतंत्र्य स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका. ज्यांची हकालपट्टी करण्यात आली ते शिवसेना-भाजपा युती असताना पराभूत झाले आहेत त्यांना आता भाजपाचा पुळका आला असल्याचा,” टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पुढे राऊत म्हणाले, “बंडखोरांच्या नेत्यांना असे बोलावे लागते. शिवसेनेची ताकद आम्हाला माहितीय.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय खळबळ माजलीय हे माहिती आहे.
शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे.
इतके दिवस मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही. ‘एक दुजे के लिए’ असा सिनेमा राजकारणात सुरू आहे.
त्या सिनेमाचा शेवट कसा झाला सगळ्यांना माहिती असल्याचं,” ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | eknath shinde group does not have the power to change history shivsena mp sanjay raut
हे देखील वाचा :
Vijay Shivtare | शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी