पुणे : बहुजननामा ऑनलाइन – आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर टीका करत संताप व्यक्त केला. शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. लोकशाहीतील राजाने योग्य वागले पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधीच स्वतःच घर भरलं नाही. यांची संपत्ती कुठून आली, हे गर्भश्रीमंत होते का ? असे म्हणत उदयराजेंनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत फक्त पुस्तकाबद्दलच बोलले नाहीत, तर त्यांनी इतर गोष्टींचाही समाचार घेतला.
‘स्वार्थाने एकत्र आलेले फार काळ एकत्र राहत नाहीत. ज्यावेळी त्यांचा स्वार्थ साध्य होतो तेव्हा ते आपआपल्या मार्गाने निघून जातात, हे राज्याच्या जनतेला सांगावेसे वाटते. लोकं जेव्हा विचारांनी एकत्र येतात तेव्हा ते कायमस्वरूपी एकत्र राहतात. लोकांना विचारांनी एकत्र आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. माझ्याकडून चूक होत असेल तर मला माफ करा. मला मित्र या नात्याने माझी चूक सांगा ? स्वातंत्र्य मिळवून आपण काय मिळवलं ? अशी असते का लोकशाही ? राजेशाही असती तर एकालाही उपाशी ठेवलं नसत, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.