बहुजननामा ऑनलाईन – साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला फायदा होणार असला तरी शिवसेनेचे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये उदयनराजे यांनी राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. त्यावेळी शिवसेनेने युतीकडून जागा लढविली होती. साताऱ्याची जागा आधी पासून शिवसेनेकडे असताना उदयराजे भाजपात आल्यामुळे शिवसेनेला ही जागा सोडावी लागणार आहे. याचा अर्थ लोकसभा लढविण्यासाठी मिळणाऱ्या जागांपैकी शिवसेनेची एक जागा कमी होणार आहे.
हे शिवसेनेचे एकप्रकारे नुकसानच आहे.
दरम्यान उदयनराजे यांच्यावर शिवसेनेने आग्रलेखातून टीका केली आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने टोला मारला आहे. उदनयराजेंनी भाजप प्रवेशावेळी कॉलर उडवली नसल्याचा दाखलाही सामनातून देण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणुक शिवसेनेकडून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना ४ लाखांहून अधिक मते मिळवून ते विजयी झाले होते. मात्र उदयनराजेंच्या भाजपप्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आता जागेवर युती काय तोडगा काढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.