बहुजननामा ऑनलाइन टीम : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युद्ध रंगल्याचे दिसत आहे. अमृता फडणवीस यांनी फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून कोणी ठाकरे होऊ शकत नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना निशाणा साधला होता. त्यांच्या या विधानावरुन शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्याचबरोबर पिंपरीमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारत राघोबादादा तुमच्या आनंदीबाईंना आवरा अशी घोषणा केल्या होत्या.शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमृता फडणवीस यांनी पिंपरीमधील आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत शायरीच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केल्या होत्या. ‘You don’t lead people by hitting people over the head, that’s assault – not leadership CM Uddhav Thackeray’ असे म्हणत ‘दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौ है पुराना आपका, हम तो वो शक्स है की धुप में भी निखर आएँगे’ या शायरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
अमृता फडणवीस यांच्या या टीकेला युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी इशारा दिला आहे.वरुण सरदेसाई म्हणाले की, गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करायच्या अनेक संध्या दिल्या पण शिवसेनेने कधी ही वैयक्तिक टीका केली नाही कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसायची तयारी ठेवा. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे देखील हेच मत असल्याचे समजत असल्याचे त्यांनी सांगितले.’माझे आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही,’ असे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात म्हंटले होते.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही त्यांच्यासारखे काम करावे लागते तरच माणसे मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती.राहुल गांधी यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करणाऱ्या आणि सावरकरांबाबत आग्रही भुमिका मांडणाऱ्या शिवसेनेला भाजपाने कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला होता. सावकरांविषयीची भुमिका शिवसेनेने स्पष्ट करावी, मुख्यमंत्री लाचार झाले, राहुल गांधी यांचा निषेध करुन दाखवाच, अशी आव्हाने भाजपाने शिवसेनेला दिली होती. त्याचवेळी हिवाळी अधिवेशन असल्याने उद्धव ठाकरेंना घेरण्याती रणनीती भाजपाने आखली होती.
Visit : bahujannama.com