मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि शनिवारी राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांसमवेत झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांचे नेत्यांनी सरकार स्थापनेसाठी आपला दावा मांडतील की नाही यावर स्पष्टपणे काहीही सांगितले गेले नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा केली जाईल. सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला जाणार नाही, असे म्हंटले आहे.
NCP leader Sharad Pawar on Maharashtra government formation: The process to form government has begun, the government will run for full 5 years. pic.twitter.com/fJ8HOD6u9N
— ANI (@ANI) November 15, 2019
दरम्यान, या तिन्ही पक्षांच्या झालेल्या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रामवर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सहमती झाली आहे. तीन पक्षांच्या शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद, त्याचबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खात्यात एका उपमुख्यमंत्र्यांची पदे तसेच शिवसेनेला १४ + राष्ट्रवादी काँग्रेसला १४+ काँग्रेस १२ च्या सूत्रानुसार विभाजनावर करार झाला आहे. हा फॉर्म्युला ठरल्यानंतर शनिवारी राज्यपालांसमवेत होणाऱ्या बैठकीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सरकार स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे.
तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असून जे काही सरकार स्थापन होईल ते पाच वर्षे चालेल. जर कोणी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करेल तर त्याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, बहुमत मिळूनही भाजप -शिवसेना सत्ता स्थापन करण्यास अयशस्वी ठरल्याने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवे समीकरण दिसणार आहे. तरी सत्ता स्थापनेला उशीर झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com