मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पक्षनेते जोरदार प्रचार करत आहेत , विरुद्ध नेत्यांवर आरोप प्रत्यारोपांची फेरी सुरु आहे. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेमुळे चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार यांच्या आरोपांवर ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू मांडत शरद पवारांना प्रतिउत्तर दिले आहे. ‘आधीच्या सरकारने जे केले तेच आताच्या सरकारने केले आहे, आधीच्या सरकारने आताच्या सरकारसाठी काही डबोले ठेवलेले नव्हते, कर्ज होतेच , कर्ज काढून आधीच्या सरकारने काम केले आहे, अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी पवारांना सुनावले आहे.
दरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रातील कर्जवाढीसाठी , बेरोजगारीची, भाजप सरकारला धारेवर धरले आहे. तसेच महाराष्ट्रातील मंदीला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत सरकारवर टीका केली आहे. मात्र सत्तेत राहूनही सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेने पवारांच्या याच टीकेवर मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. ठाकरे पुढे म्हणाले कि, ‘महाराष्ट्राला गुजरातच्या दिशेने नेण्याच्या प्रश्नांची पवारांनी चिंता करू नये, कारण महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे आणि शिवरायांचाच राहील, पवार जर राज्याच्या अधोगतीला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत असतील तर , पवारांना सांगू इच्छितो कि, २०१४ ला सध्याच्या सरकारची पहिली वाट हि पवारांनीच लावली होती आणि याची कबुली अजित पवार देतच आहेत.’
२०१४ साली जर राष्ट्रवादीने चोमडेपणा केला नसता तर राज्याचे चित्र आज काही वेगळे असते. आघाडी सरकारने कर्जाचा डोंगर उभा करून कामे केली होती. आता देखील तेच होत आहे. आधीच्या सरकारने काही डबोले ठेवलेले नव्हते, अश्या शब्दात सामन्याच्या अग्रलेखात उद्धव यांनी पवारांना खडे बोल सुनावले आहे.
Visit : bahujannama.com