बहुजननामा ऑनलाईन टीम : काल दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. आता सोशल मीडियावरही नव्या मुख्यमंत्रीला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर एकीकडे संयज राऊत यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टिका केली आहे. राऊत यांनी ट्विट केले की, ‘महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहणार नाही’, असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देऊन राऊत यांनी चांगलाच टोला लगावला. भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे.
महाराष्ट्र में विरोधी पक्ष ही नहीं रहेगा, यह दावा करने वाले पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विरोधी दल नेता चुने जाने पर हार्दिक बधाई…!
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित असणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे उद्धव ठाकरे यांची भेट न घेता तेथून निघून गेले. यामुळे संजय राऊत यांनी आभाराचे ट्विट केले. त्याचबरोबर ‘शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.’ असे राऊतांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.
शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहोळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल मा.देवेंद्रजी फडणवीस व मा.चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद.
हे नाते असेच राहू दे.— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
फडणवीसांचा ‘ठाकरे सरकार’वर जोरदार हल्लाबोल
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले की, ‘कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली,’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मोठ्या सत्तानाट्यानंतर गुरूवारी अखेर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. पण त्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
उपस्थित केले हे सवाल..
– या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का ?
– स्वतःच्या आमदारांवर इतका विश्वास का ?
-अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का ?
– नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी?
– शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी?
- भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का ?
नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली तोफ लगावली आहे. आता या पुढची लढाई कशी असेल याचे संकेत मिळाले आहे. नव्या सरकारचा जो किमान समान कार्यक्रम जाहिर करण्यात आला त्यात घोषणांचा पाऊस आहे. मात्र, राज्याच्या मागासलेल्या भागासाठी काहीही नाही अशी टिका फडणवीस यांनी केली आहे. ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्ष मागे राहिलेला क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्देवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.’
Visit : bahujannama.com