मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेने पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. गेल्या साडेपाच वर्षांपासून केद्रात सत्ता असतानाही सावरकारांना भारतरत्न देण्यापासून कोणी रोखलं होतं असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. याआधी सावरकरांना कलंक आणि माफीवीर म्हणून हिणवणारी आयात मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत त्यांचे तुम्ही काय करणार ?
सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा तुमचा प्रकार सुरु असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे. सावरकारांबद्दल नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देश का पेटला याचे उत्तर आधी जनतेला द्या अशी मागणीही करण्यात आली आहे. लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न सध्या समोर आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही वचन बद्ध असल्याचेही अग्रलेखात म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात भडका उडाला आहे. केंद्र सरकारच्या हाताबाहेर प्रकरण गेले आहे. कायद्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या, गोळ्या चावलल्या. दिल्लीतील पोलिसांची कारवाई अमानुष आणि बेकायदेशीर आहे. जालियनवाला बाग हत्याकांडात इंग्रज यापेक्षा वेगळे वागले नव्हते अशी टीकाही करण्यात आली आहे.
वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच. प्रश्न इतकाच आहे की, गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. ‘भारतरत्न’ देऊन सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते? दुसरे असे की, सावरकरांना ‘कलंक’ आणि ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारी ‘आयात’ मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत. त्यांचे तुम्ही काय करणार आहात? महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता सुधारणा विधेयकावरून देश का पेटला, याचे उत्तर आधी जनतेला द्या.
Visit : bahujannama.com