बहुजननामा ऑनलाइन- शिवसैनिकांनी मुंबईत कांदिवलीमधील माजी नौदल अधिकार्याला मारहाण केली होती. त्यावरुन आता राजकारण पेटले असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. माजी नौदल अधीकार्यावर शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा संतप्त आणि उत्स्फूर्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे हे दुर्देवी आहे. संयम दोन्ही बाजूने पाळला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्राच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांचा संयमाचा बांध तुटतो. म्हणून सर्वांनी जबाबदारी वागले पाहिजे नाहीतर समाजात तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भूमिक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेलं व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केले होते. त्यामुळे त्यांना घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. शिवसेनेचे 2 शाखा प्रमुख आणि 7-8 शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता.