अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद पेटल्याने आजपासून शिर्डीत बेमुदत बंद करण्यात आला आहे. स्थानिक रहिवाशांनी शिर्डीतील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. परभणीतील पाथरी येथील साईबाबांचा जन्म झाल्याचा दावा केल्यापासूव हा वाद चिघळला आहे.
परभणीतील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला आहे. त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल, अशी घोषणा केल्यानंतर शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत.
साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचा दावे केले जात असून त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा प्रयत्न केला असून तो निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पाथरी ग्रामस्थांच्या दाव्याचा निषेध करण्यासाठी संतप्त शिर्डीकरांनी रविवारीपासून शिर्डी बंदची हाक दिली आहे. आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ग्रामस्थांनी शनिवारी तातडीची ग्रामसभा बोलावली होती. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिर्डी ग्रामस्थांशी ते चर्चा करणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी याबाबत एका बैठकीचे आयोजन केले आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा